लातूरच्या औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था पाहून अभिजीत दिपके यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका केली. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत पाहणीदरम्यान शाळेची रखडलेली कामे, सुविधांचा अभाव आणि ग्रामस्थांच्या तक्रारीही समोर आल्या.
नागपुरातील नरेंद्रनगर परिसरात प्रेमत्रिकोणातून दोन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांमध्ये रस्त्यावर जोरदार हाणामारी झाली. या संघर्षात गौरव राऊतने गौरव रगडेच्या छातीत चाकूने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी रगडेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत २१ ऑगस्ट रोजी विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत “शक्तिपीठासाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू” असा इशारा दिला. सतेज पाटील, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व महिला मोर्चात सहभागी झाले. सरकारने महामार्गाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि सत्ताधारी आमदार-खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये १८ वर्षीय मुलाने डोंगरावरून उडी घेतल्यानंतर त्याला वाचवताना आई-वडीलही खाली पडले. या दुर्घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी एरिनामध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या दिवशी पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी, ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टोसह भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत. याशिवाय चोऊ तिएन-चेन, लोह कीन यू, जोनाथन क्रिस्टी आणि ली शिफेंग यांसारख्या दिग्गजांच्या सामन्यांमुळे आजचा दिवस रोमांचक ठरणार आहे.
E20 पेट्रोलच्या वापरामुळे जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये घट आणि काही पार्ट्सच्या देखभालीबाबत तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जुन्या वाहनांसाठी पुन्हा E10 पेट्रोल उपलब्ध करण्याचा विचार करत आहे. E10 आणि E20 दोन्ही पर्याय उपलब्ध झाल्यास वाहनधारकांना त्यांच्या वाहनाच्या क्षमतेनुसार इंधन निवडता येईल; मात्र दोन्ही इंधनांच्या स्वतंत्र वितरणासाठी सरकारसमोर पायाभूत सुविधांचे मोठे आव्हान असेल.
MMRDAच्या 235 इंजिनिअर पदांच्या भरती परीक्षेच्या निकालावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर प्राधिकरणाने तीन सदस्यीय उच्चस्तरीय समितीमार्फत तक्रारींची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना पुरावे आणि कागदपत्रांसह 30 दिवसांत तक्रार करण्याची संधी देण्यात आली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत भरतीची पुढील प्रक्रिया स्थगित राहणार आहे.
पुण्यातील बावधन परिसरात पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून, दुचाकीस्वारांसाठी परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि योग्य जलनिस्सारण व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
राहुल गांधी 22 ऑगस्टला पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी 18 ते 31 ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याने कार्यक्रमावर निर्बंधांचं सावट आहे. या निर्णयावर काँग्रेसने आक्षेप घेत प्रशासनावर कार्यक्रम रोखण्याचा आरोप केला असून, गरज पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.
चाकण MIDCमधील रस्ते, ड्रेनेज, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चाकणच्या धर्तीवर रांजणगाव, शेंद्रा, वाळूज, तळेगाव आणि बिडकीनसह राज्यातील महत्त्वाच्या MIDCमध्ये टप्प्याटप्प्याने Industrial Township Act लागू करण्याचा विचार आहे.
नितीन देसाईंच्या N.D. स्टुडिओची मालकी महाराष्ट्र सरकारकडे आली असून आशिष शेलार यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. 31 मार्च 2027 पर्यंत शूटिंग आणि इतर सुविधांवर 50% सवलत देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेदरम्यान 9.78 कोटी मतदारांपैकी सुमारे 7.69 कोटी फॉर्म डिजिटाइज झाले आहेत. मात्र, 2 कोटींहून अधिक मतदारांचे फॉर्म अद्याप जमा झालेले नाहीत. 24 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून विरोधकांनी मुदतवाढीची मागणी केली आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील निर्माणाधीन बोगदा दुर्घटनेत आणखी दोन कामगारांचे मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे. 13 ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून सहा दिवस शोधमोहीम राबवण्यात आली.
हिंगोलीतील संतुक पिंपरीत अभिजीत दिपकेंनी ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू केले. ZP शाळेतील फुटक्या खिडक्या, अस्वच्छ शौचालये आणि पोषण आहारातील कथित तफावत समोर आली. विद्यार्थी व पालकांच्या समस्या नोंदवून त्यांचा डेटा संकलित केला जाणार आहे.
पुण्यातील नऱ्हे पोलिसांनी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान बेनकर वस्ती परिसरात एका फार्च्युनर वाहनातून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनासह एकूण ६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करीत आहेत.
पुण्यातील चिखली-मोई फाटा परिसरात इंद्रायणी नदीच्या ब्ल्यू फ्लड लाईनमध्ये येणाऱ्या कथित अनधिकृत बांधकामांवर NGTने मोठा निर्णय घेतला आहे. PCMCला संबंधित बांधकामांची ओळख पटवून तीन महिन्यांत पाडकाम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संयुक्त समितीच्या पाहणीत २० बांधकामे ब्ल्यू फ्लड लाईनमध्ये असल्याचे समोर आले. मात्र, रहिवाशांनी फ्लड लाईन जुनी असल्याचा दावा करत नव्याने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.
अभिजीत दिपके यांनी १५ ऑगस्टपासून ग्रामीण भागातील सरकारी शाळांसाठी CJPची विशेष मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. गावातील शाळांची दुरवस्था दूर करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
पुण्यात स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवून घेणाऱ्या स्वप्नील लांडेविरोधात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून आणखी तक्रारी आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
पुण्यात ऑटोरिक्षा आणि कॅबचालकांसाठी मराठी भाषेचे कार्यकारी ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. १५ ऑगस्टनंतर अचानक तपासणी सुरू होणार असून, मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 9 जिल्ह्यांत तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनी वारे बळकट होण्याची शक्यता आहे.
पुणे सायबर पोलिसांनी डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणात 26 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रोहन राजेश्वर जाधवला अटक केली आहे. 82 वर्षीय निवृत्त व्यावसायिकाची 10.73 कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या प्रकरणात 1.74 कोटी रुपयांच्या व्यवहारांशी जाधवचा कथित संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब गुरुद्वारा परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून हल्ल्यामागील नेमका उद्देश तपासला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेत बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
“पुण्यात घरांच्या विक्रीत 7% वाढ; तीन वर्षांच्या घसरणीनंतर रिअल इस्टेट बाजारात सुधारणा मात्र, नवीन प्रकल्पांचा वाढता पुरवठा आणि मागणीतील तफावत यामुळे न विकलेल्या घरांचा साठा विक्रमी ₹92,110 कोटींवर पोहोचला आहे.
11 ऑगस्टला पुण्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत तिरंगा रॅली होणार असून FC रोडसह काही प्रमुख मार्गांवर दुपारी 2 वाजल्यापासून वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन आधीच करावे.
झारखंडमध्ये JPSC परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप उफाळला असून, विधानसभेकडे काढलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांशी झटापट झाली.
पोलिसांनी अश्रुधुराचा मारा, पाण्याच्या तोफांचा वापर आणि लाठीचार्ज केला; दरम्यान सरकारने तीन परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे.
महाराष्ट्रासह केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला असून, कामगिरीच्या आधारे काही मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर राज्यातील संभाव्य विस्तार आणि खातेवाटपाबाबत चर्चांना आणखी उधाण आले आहे.
बारामती एअरस्ट्रीपजवळ रविवारी एका खासगी कंपनीच्या प्रशिक्षण विमानाचे क्रॅश-लँडिंग झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, जानेवारीत याच परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 13 मे रोजीही बारामतीजवळ प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला होता, मात्र त्यातील प्रशिक्षणार्थी पायलट सुरक्षित बचावला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामती एअरस्ट्रीपवरील विमान सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
झारखंडमध्ये कथित पेपर लीक आणि परीक्षेतील अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून सरकारने विविध विद्यार्थी संघटनांशी चर्चा केली. मात्र, चर्चेत ठोस तोडगा निघाला नाही. आंदोलकांनी 14वी JPSC परीक्षा रद्द करण्यासह सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. NSUIने संशयित JPSC-JSSC परीक्षांची 90 दिवसांत CID चौकशी आणि NTAच्या धर्तीवर Jharkhand Testing Agency (JTA) स्थापन करण्याची मागणी केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासमोर मांडण्याचं आश्वासन दिलं आहे.
पुण्यातील कोथरूडमधील ६२ वर्षीय महिलेची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडीओचा वापर करून ८ लाख ९ हजार १०६ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. फेसबुकवर बनावट गुंतवणूक व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेने आपली वैयक्तिक माहिती शेअर केली. त्यानंतर सायबर ठगांनी तिला टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडून शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. त्यांच्या सांगण्यावरून महिलेने विविध बँक खाती आणि UPI आयडीवर पैसे पाठवले. २४ मे २०२६पर्यंत तिने एकूण ८.०९ लाख रुपये ट्रान्सफर केले.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधिमंडळातील फूट ही राजकीय फूट मानता येत नाही, तसेच शिंदे गटाला खरी शिवसेना घोषित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नव्हता, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने अपात्रतेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील रस्त्यांची दुरवस्था गंभीर बनली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका आणि वाहतूक कोंडी वाढली आहे. पावसामुळे खड्डे पाण्याखाली जात असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ते दुरुस्ती व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. महिलांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अस्वीकार्य असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसने बिनशर्त जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. राजकीय मतभेद असले तरी महिलांचा सन्मान राखला पाहिजे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, काँग्रेस आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील (BMC) सत्ताधाऱ्यांकडून नवीन महागड्या गाड्यांच्या खरेदीसाठी चाललेली पैशांची उधळपट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे रोखली गेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर, भाजपच्या सभागृह नेत्यांना अखेर हा वादग्रस्त प्रस्ताव मागे घ्यावा लागला आहे. यामुळे पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनावर मोठी नामुष्की ओढवली आहे.